हे सुद्धा वाचा 10 वी पासवर मिळवा रेल्वेत नोकरी इथे बघा अर्जप्रकिया
यासंदर्भात २ ऑगस्ट रोजी पारित झालेल्या शासन निर्णयात नमूद आहे की, जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये अवेळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले.फेब्रुवारी महिन्यात अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात ९ हजार ६४४, अकोला ११ हजार ८०७, यवतमाळ ११ हजार २४३, बुलढाणा ५७ हजार २४० आणि वाशिम जिल्ह्यातील ८ हजार २४१ शेतकरी यामुळे बाधित झाले. भरपाईपोटी १४१ कोटी १२ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.तसेच मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये देखील विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १ लाख १५ हजार ४७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी २४१ कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
५ ऑगस्टपासून प्रत्यक्षात हा निधी ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.